Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावणदहनावर बंदी घालणारी याचिका फेटाळली

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (17:04 IST)

दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या रावणदहनावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक जनहित याचिकाफेटाळून लावली. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना धार्मिक आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असे कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी दिले आहे. सरन्यायायाधीश जे.एस. खेहर आणि न्या. डी.वाय. चंद्रचुड यांनी या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्यघटनेतील 25 व्या कलमातील तरतूदींची आठवण करून दिली.

हरियाणातील पत्रकार आनंद प्रकाश शर्मा यांनी रावणदहनाच्या विधीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या प्रथेचा वाल्मिकी रामायण किंवा तुलसी रामायणात कोणताही आधार किंवा समर्थन आढळत नाही, असे शर्मा यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. या प्रथेमुळे हिंदूंमधील एका गटाच्या भावनाही दुखावल्या जातात आणि त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होत असते, असाही दावा या याचिकेमध्ये करण्यात आला होता.

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments