Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअर इंडियाची मालकी घेताच टाटा ग्रुपने घेतला 'हा' निर्णय

The Tata Group took this decision as soon as it took over the ownership of Air Indiaएअर इंडियाची मालकी घेताच टाटा ग्रुपने घेतला 'हा' निर्णय Marathi National News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (10:53 IST)
एअर इंडियाची मालकी आता अधिकृतरित्या टाटा कंपनीकडे गेली आहे. यासंदर्भात मालकी हक्कांचं हस्तांतरण पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्यावर्षी 8 ऑक्टोबर रोजीच टाटा समूहाने 18 हजार कोटींच्या बोलीत एअर इंडियाला खरेदी केली. 2700 कोटी रुपये रोख रक्कम आणि 15300 कोटी रुपयांचा कर्ज आपल्या डोक्यावर घेत टाटानं एअर इंडियाला आपल्या ताब्यात घेतली.
 
एएनआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाची मालकी स्वीकारताच टाटा ग्रुपने सर्वप्रथम एअर इंडियाच्या लेटलतिफपणाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 
एअर इंडियाच्या विमानांचं उड्डाण वेळापत्रकानुसार होईल यासाठी टाटा ग्रुप प्राधान्य देणार आहे.
यासोबतच एअर इंडियाच्या विमानांमध्येही काही बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. विमानातील आसन व्यवस्था, केबिन क्रू पेहराव, जेवणाची गुणवत्ता याकडेही प्रामुख्याने लक्ष दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'हिटलरचा बाप' हॅशटॅग वापरून जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?