Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाचा मतदानाचा हक्क काढून घ्या - रामदेव बाबा

Webdunia
देशातील वाढत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून सरकारने कुटुंबातल्या तिसऱ्या मुलाला मतदानाचा अधिकार न देणारा कायदा संमत करावा. तसंच गोहत्या आणि दारूवर पूर्णत: बंदी घालावी, अशी मागणी रामदेव बाबा यांनी रविवारी केली आहे. 
 
"पुढील 50 वर्षांत भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या पुढे जाता कामा नये. आपण त्याहून अधिक लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी तयार नाही आहोत. लोकसंख्येवर अंकुश लावायचा असल्यास तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार नकारण्यासोबतच त्याला कोणत्याही सरकारी सुविधा-योजनेचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा सरकारने मंजूर करायला हवा", असं रामदेव म्हणाले.
 
असं केलं तरच सर्व जाती-धर्मांचे नागरिक तिसऱ्या अपत्याला जन्म देण्याचे टाळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments