Publish Date: Mon, 27 Feb 2017 (09:32 IST)
Updated Date: Mon, 27 Feb 2017 (09:36 IST)
काश्मीर भारताने गमाविले आहे हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे केंद्रीय शहरी विकासमंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी येथे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तेलंगण भाजपने येथे एका सभेचे आयोजन केले होते, त्यात वैंकय्या नायडू बोलत होते.