Publish Date: Mon, 19 Jun 2017 (08:59 IST)
Updated Date: Mon, 19 Jun 2017 (09:05 IST)
ओडिशाला विशेष दर्जा देण्याची गरज नाही, असे ठाम मत परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केले आहे. खरे तर ओडिशाने विकासाची हवी तेवढी पातळी अजिबात गाठलेली नाही,उलट या राज्यांची प्रगती अत्यंत कूर्मगतीने सुरू आहे. याचा जाब या राज्यावर गेल्या 17 वर्षांपासून राज्य करणार्या सरकारने द्यावा, असेही सिंग यांनी सुनावले आहे. खरे तर या राज्याला आमचे सरकार आधीच्या सरकारपेक्षा 10 टक्के अधिक निधी देत आहे.