Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शांततेसाठी अनोखा प्रयत्न

Webdunia
भारत आणि पाकिस्तान या  दोन्ही देशातल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शांतता प्रस्थापित करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सादर करत मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर पाक ग्रुपने ‘जन गण मन’ सादर करत साद दिली आहे.
 
दोन्ही देशांच्या सीमेवर राहणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ राम’ नावाच्या ग्रुपमधील तरुणांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सादर केलं होतं. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘पाक सरजमीन’ सादर करण्यात आलं. त्यामुळे ‘व्हॉईस ऑफ राम’ बँडविरोधात विविध स्तरातून टीकेची झोड उठली होती.  पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी मात्र ‘जन-गण-मन’ सादर करुन अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं आहे. एकत्रित गायलेल्या या राष्ट्रगीतांना ‘शांतिगीत’ असं नाव देण्यात आलं आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments