Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मिर हा भारता आहे - स्वराज

Webdunia
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (10:24 IST)
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, असाच तो  कायम राहणार आहे. काश्मीर बळकावण्याचं स्वप्न कोणीही पाहू नये, अशा कठोर शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानलाइशारा दिला आहे. सुषमा स्वराज यांनी 71 व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने पाकिस्तानचे कान ओढले आहेत.

दहशतवादाला थारा देणारे सर्वात मोठे दोषी असतात. दहशतवादाला पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक असतो, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला.  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानात काय चाललं आहे, ते पाहावं, असंही स्वराज  म्हणाल्या आहेत.

विशेष म्हणजे, सुषमा स्वराज यांनी हिंदीतून भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी मानवता, शांती आणि गरिबीवर भाष्य केलं आहे . त्यानंतर त्यांनी जागतिक आणि देशाबाहेरील दहशतवादाकडे मोर्चावर बोलणे सुरु केले. काश्मीरला भारत भूमीपासून कोण आणि  कुणीही वेगळ करू शकत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणारच आहे. पाकिस्तानने काश्मीर मिळवण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे असा सणसणीत टोला स्वराज यांनी पाकला लगावला आहे.स्वराज यांनी अनेक गोष्टी पाकिस्थान आणि त्याच्या निकटवर्तीय देशांना समजाऊन सांगितल्या आहेत. त्यामध्ये जराही हुशारी केली तर सर्व गोष्टी बिघडू शकतात असा इशारा स्वराज यांनी दिला आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments