rashifal-2026

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

Webdunia
4
मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण भविष्यात हे काम रोज्याचा रोज करण्याची गरज उरणार नाही. कारण, यापुढे एकदा चार्ज केलेला मोबाइल तब्बल तीन महिने चार्ज करण्‍याची गरज लागणार नाही.
चकित झालात ना? पण हे खरे आहे. सध्याच्या शंभरपट कमी ऊर्जेचा वापर करणार्‍या मोबाइल प्रोसेसरचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. मिशिगन आणि कॉर्नेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. मॅग्नेटोइलेक्ट्रि मल्टीफेरिक असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण चुंबकीय ध्रुवीय फिल्म तयार करणार्‍या अणूंचा थर पातळ करते. याच सिद्धांताचा वापर करून बायनरी कोड 1 आणि 0 कडे पाठविण्यासाठी करण्यात येतो, ज्यावर आपल्या संगणकाचे काम चालते.
 
मोबाइलमधील सध्याचे प्रोसेसर सेमीकंडक्टर प्रणालीचा वापर करून बनवले जातात. या प्रोसेसरना सतत वीजपुरवठ्याची गरज असते. याउलट, मॅग्नेटोइलेक्ट्रिक मल्टीफेरिक्स यंत्रणेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रोसेसरला विजेच्या कमीत कमी दाबाची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा प्रोसेसर विजेचा केवळ एक छोट्यात छोटा भाग वापरून डेटा मिळवू शकतो किंवा पाठवू शकतो.
 
जगभरातील सध्या ऊर्जा वापरापैकी पाच टक्के ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वापरली जाते. 2030 पर्यंत हेच प्रमाण 40 ते 50 टक्के इतके होणार आहे. त्यामुळे हे नवे तंत्रज्ञान ऊर्जा वापराच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असे मत लॉरेन्स वर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील सहायक संचालक राममूर्ती रमेश यांनी व्यक्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments