Festival Posters

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

Webdunia
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही त्यापासून दूर राहणे कठीण जाते. आपल्या जीवनातील त्याच्या वाढत्या शिरकावामुळे अनेकजण त्याच्या आधीन गेले आहेत. स्मार्टफोनच्या या व्यसनाबाबत जाणून घेण्यासाठी हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की स्मार्टफोनच्या आधीन  होण्‍यामागे सामाजिक प्रवृत्ती हे कारण आहे. वेगाने विकसित होणार्‍या तंत्रज्ञानामुळे लोकांना सामाजिक संपर्काची सवय लागली आहे.
 
कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनानुसार लोकांमधील स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण हायपर सोशल नाही, तर अँटी सोशल आहे. आतापर्यंत असे वाटत होते की बहुतांश लोक आपल्या मोबाइलवर मेसेज करतेवेळी वा नोटिफिकेशन तपासताना आपल्या जवळच्या लोकांपासून दूर होतात. अशा लोकांना आपण त्यांना समजापासून तुटलेले वा अँटीसोशल समजू लागतो. मात्र वास्तवात तसे नसते.
 
या अध्ययनानंतर शास्त्रज्ञांनी पालक व शिक्षकांना काही सल्ला दिला आहे. त्यांच्या मते इतरांच्या संपर्कात राहणे चांगली गोष्ट आहे. खरे महणजे मनुष्य सामाजिक प्राणी असून जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहवेसे वाटते. म्हणून तो सतत स्मार्टफोन इतरांचे प्रोफाइल व ते काय करतात, हे पाहत असतो, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायला हवी. आजची युवा पिढी पालकांना पाहूनही स्मार्टफोनचा जास्त वापर करण्यास प्रेरित होते. त्यामुळे पहिल्यांदा पालक व शिक्षकांनी ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांवर; उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

LIVE: उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

मुलीच्या जन्माचा आनंद शोकात बदलला; नाशिक अपघातात सुट्टीवर असलेल्या जवानाचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात गुगल मॅपच्या नादात कुटुंब कोसळलं नाल्यात

भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी नियम बदललेले; आता व्हीआयपी प्रवेश नाही

पुढील लेख
Show comments