Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेठान : शेतातील खड्ड्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 12 जुलै 2022 (21:24 IST)
आंबेठाण येथे सख्ख्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलांचे वडील किशोर दास कामगार असून भाड्याच्या खोलीत राहतात. घराजवळ असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून या तिघा भावांचा मृत्यू झाला रोहित दास,(7 वर्षे), राकेश दास(5वर्षे),श्वेता दास(6 वर्षे ) अशी मयत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबियांना मोठा धक्का लागला आहे. हे शेत आंबेठाणातील नामदेव भिकाजी लांडगे यांचे असून त्याच्या जवळ भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर असून त्या घरात कामगार किशोर जोगेश्वर दास हे राहत होते. या घरा जवळच खडडा होता आणि तो पाण्याने भरलेला होता.त्यात पावसाचं पाणी साचलं होत आणि हे तिघे त्यात खेळत असताना त्यांना खड्ड्याच्या अंदाज आला नाही आणि ते तिघे पाण्यात बुडून मरण पावली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments