Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लशींच्या कमतरतेमुळे लसीकरण पूर्ण क्षमतेने राबविता येत नाही – आयुक्त पाटील

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (15:30 IST)
पिंपरी-चिंचवड शहराला कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम पूर्ण क्षमेतेने राबविता येत नसल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
 
महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयात  प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक अधिका-यांसमवेत प्रभाग क्रमांक 18 आणि 22 मधील समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक विनोद नढे, राजेंद्र गावडे, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, नीता पाडाळे, स्वीकृत नगरसदस्य विठ्ठल भोईर, क्षेत्रीय अधिकारी सोनल देशमुख तसेच स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
उपस्थित नगरसदस्यांनी नदी सुधार प्रकल्प आणावा, रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, पालिकेने हाती घेतलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, काळेवाडी येथील रस्ते सिमेंटचे करावेत, भारतमाता चौकात हातगाडी संदर्भात कारवाई व्हावी, रस्त्यावरील अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, पाणीपट्टीची बिले नागरिकांना वेळेवर मिळवीत, धूर फवारणी व्यवस्थापन नीट करावे, विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरत आहे आदी समस्या मांडल्या.
 
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांनी संबंधित अधिका-यांना नगरसदस्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी असे आदेश दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments