Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (18:21 IST)
पुणे : राज्यात थंडी वाढली असतानाच किमान तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आता थंडीचा प्रभाव जोर धरणार आहे. दरम्यान मंगळवारी औरंगाबाद येथे सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
 
उत्तरेकडील राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेशच्या भागात थंडीची लाट पसरली आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे. तसेच या भागात मोठय़ा प्रमाणात धुके पसरले आहे. पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा आधीच घसरला आहे. नवीन वर्षाची सुरुवात थंडीनेच झाली आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांत वाढ होणार असल्याने पुढील तीन ते चार दिवसांनंतर मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
राज्यातील प्रमुख शहरांत मंगळवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
 
कुलाबा 18.8, सांताक्रूझ 15.8, रत्नागिरी 17.8, डहाणू 15.4,पुणे 10.9, लोहगाव 14.3, जळगाव 10, कोल्हापूर 18, महाबळेश्वर 14.2, नाशिक 10.2, सांगली 16.9,सातारा 14.5,सोलापूर 18.8,परभणी 14.6,नांदेड 16.8, अकोला 14.4, अमरावती 14.9, बुलढाणा 13.2, ब्रह्मपुरी 14.5, चंदपूर 16.3, गोंदिया 11.6, नागपूर 13.6, वाशिम 14.8, वर्धा 13.8, यवतमाळ 15.5, पणजी 20.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

अमेरिकेत तीव्र वादळाचा तडाखा, इमारती कोसळल्या; केंटकीमध्ये 14 आणि मिसूरीमध्ये सात जणांचा मृत्यू

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

पुढील लेख
Show comments