Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील चित्रपटांसंबंधी काम करणाऱ्या चार संस्थांचे विलिनीकरण

Webdunia
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:32 IST)
पुण्यातील चित्रपटांसंबंधी काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या चार संस्थांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विलिनीकरणाला मान्यता दिली. पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) तसेच फिल्म डिव्हिजन, डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल आणि चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या चार संस्थांचे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये (एनएफडीसी) विलीनीकरण होणार आहे. या चार संस्थाही यापुढील काळात एनएफडीसीअंतर्गत काम करणार असल्याने पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कदाचित स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही.
 
पाच संस्थांनी एकाचप्रकारचे काम करून उपक्रमाची नक्कल होण्याचा धोका टाळून खर्च वाचवण्याचा प्रयत्न होणार आहे. विलीनीकरणाच्या संदर्भातील प्रक्रियेसाठी तज्ज्ञ सल्लागार व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. चारही संस्थांना यापुढे एकसारखे काम करता येणार नाही. एनएफडीसीकडून ठरवल्या जाणाऱ्या धोरणाप्रमाणे संस्थांना काम करावे लागेल. प्रत्येक संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व यापुढे नसेल. एनएफडीसी या नावानेच सर्व संस्थांचे काम होईल.
 
फिल्म्स डिव्हिजनची स्थापना प्रामुख्याने सरकारी कार्यक्रमांना प्रसिद्धी आणि भारतीय सिनेमाच्या तपशीलासाठी माहितीपट तयार करण्यासाठी झाली. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी या स्वायत्त संस्थेमार्फत लहान व किशोरवयीन मुला-मुलींना मूल्याधारित मनोरंजन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. चित्रपट संग्रहालयातर्फे भारतीय चित्रपटांचा वारसा जतन करणे तसेच समाजामध्ये चित्रपट संस्कृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे भारतीय चित्रपट महोत्सव आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण असे उपक्रम राबवले जातात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

लाडकी बहीण योजना बंद करा’, संजय राऊत फडणवीस सरकारवर का भडकले?

LIVE: रायगड जिल्ह्यात खाजगी बसला अपघात

वैवाहिक वादामुळे भिवंडीतील महिलेने तीन मुलींसह केली आत्महत्या

'जर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत परत यावे', उद्धव गटाच्या नेत्याने दिली ऑफर

रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी

पुढील लेख
Show comments