Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विनापरवाना गाळप केलेल्या 9 साखर कारखान्यांना साखर कोटींचा ठोठावला दंड

Webdunia
शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:38 IST)
पुणे : विनापरवानगी गाळप हंगाम सुरू केल्यामुळे राज्यातील 9 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारवाई केली आहे. या सर्व कारखान्यांना मिळून ब्बल 38 कोटी 17 लाख 31 हजार 500 रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या साखर कारखान्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या कारखान्यांचा समावेश आहे.
 
गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना अर्ज करून साखर आयुक्तांकडून गाळप परवाना घ्यावा लागतो, त्याशिवाय साखर कारखाने सुरू केल्यास कारखान्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. विनापरवाना गाळप केलेल्या उसाला साखर आयुक्त प्रतिटन 500 रुपये दंड आकारणी करू शकतात.
 
दरम्यान, विनापरवाना गाळप केलेल्या 9 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दंड ठोठावला असून या 9 कारखान्यांना तब्बल 38 कोटी 17 लाख 31 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या नऊ कारखान्यांपैकी चार पुण्यातील, दोन सांगली, एक सातारा आणि दोन सोलापूरमधील आहेत. यातील सात कारखाने सहकारी तर दोन खासगी यांचा समावेश आहे. सर्वाधिक साडे सात कोटी दंड ठोठावलेला साखर कारखाना सांगलीच्या राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचं देखील कारखाना आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments