Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी सुरु - अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (16:04 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कोरोनाविषयक आढावा बैठक पार पडली. या बैठीकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील कोरोना स्थिती, लसीकरण आणि जागतिक स्तरावर वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्याला संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात इशारा दिला आहे.आढाव बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, जागतिक स्तरावरची माहिती घेतल्यास जगात दररोज ५ ते ६ लाखांच्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण काळजी घेतोय. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी केली जात आहे. 
 
दरम्यान खासगी रुग्णालयातील लसींच्या मुदती संपत आल्याने त्या लसी राज्य सरकार घेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालायात वापराविना पडून असलेल्या लसी मुदत संपण्याचा आत वापरल्या जाणार आहेत.या लसींबदल्यात खासगी रुग्णालयांना फ्रेश लशींचा साठा राज्य सरकारकडून देण्यात येईल.असंही ते म्हणाले. पावसाळ्य़ात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचे प्रमाण वाढले आहे.या परिस्थितीवर जिल्हाप्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष असून गरज लागल्यास निर्जंतुकीकरण आणि इतर उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. 
 
य़ावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात नव्या व्यक्तीला लसीचा पहिला डोस देण्याऐवजी ज्यांनी पहिला डोस आधीच घेतला आहे. त्यांनात लसी दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करु.तसेच राहिलेल्यांचेही लसीकरण पूर्ण करायचे. बिलं कमी करण्याविषयी कारवाई करत आहोत.असेही अजित पवार म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments