Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune Accident : नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर, सुदैवाने जीवित हानी नाही

Webdunia
शुक्रवार, 5 मे 2023 (16:25 IST)
Pune Accident : मुंबई -बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी आज सकाळी नऱ्हे सेल्फी पॉईंट जवळ एका कंटेनरच्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेरनची एका कारला पाठीमागून जोराची धडक झाली . या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही  जीवित हानी झालेली नाही . 
 
मुंबई -बंगळुरू महामार्गावर नवले पूल भागात अपघातांचे सत्र सुरूच असून गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. आज सकाळी कंटेनरने एका कारला मागून धडक दिली. या विचित्र अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी टळली आहे. 
 
कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माल वाहतूक कंटेनरच्या चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढे जात असलेल्या कारच्या मागच्या बाजूस जाऊन धडकले.अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला.   
 
नवले पुलाच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाने या भागाला ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले असून अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही या परिसरात अपघात घडतात.या भागात वाहतूक कोंडी होत असते. आज देखील अपघातानंतर वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागून वाहतूक कोंडी झाली होती. 
 
अपघातानंतर सिह्गड रस्ता वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक  आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.अपघातग्रस्त वाहनाला क्रेनच्या साहाय्याने राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकाऱ्यांनी बाजूस केले.  
 
अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. 
 
 
 

Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments