Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मणिपूरात सुरक्षेची हमी नाही, परिस्थिती कठीणच आहे, मोहन भागवतांचे वक्तव्य

mohan bhagwat
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:47 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली.येथे त्यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत वक्तव्य केले.

ते म्हणाले, सध्या मणिपूरातील परिस्थिती कठीण आहे.मणिपूरात सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिकांच्या सुरक्षितेची चिंता आहे. संघाचे कार्यकर्ते दोन्ही गटांना मदत करून वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. व्यवसायासाठी किंवा समाजसेवेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.

संघाचे कार्यकर्त्ये राष्ट्रीय एकात्मकतेची भावना वाढविण्यासाठी काम करत आहे. ते संघर्षग्रस्त मणिपूर मध्ये खंबीरपणे उभे आहे. स्थनिकांना त्यांच्यावर विश्वास बसत आहे. ज्या शक्तींना भारताची प्रगती आवडत नाही ते नक्कीच अडथळे निर्माण करतील. कारण भारताची प्रगती झाल्यामुळे त्यांची शक्ती नष्ट होणार. मणिपूरात मिताई  आणि कुकी या दोन जातींमध्ये वाद सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालाडमध्ये बांधकाम सुरु असताना इमारतीचा 20 व्या मजल्याचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू