Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधन: भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 7 वस्तू

Webdunia
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधते. हा सण साजरा करताना पूजेच्या ताटात सात वस्तू आवश्यक रूपात असाव्या. जाणून घ्या काय आहे त्या वस्तू:
 
कुंकू
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते.
 
अक्षता
कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकणे अनिवार्य असतं. याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो.
 
नारळ
नारळ म्हणजे श्रीफळ. श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना केली पाहिजे की भावाच्या जीवनात सुख-समृद्धी राहो आणि त्याची उन्नती व्हावी.
 
रक्षा सूत्र
रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहतं.
 
मिष्टान्न
राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो. गोड खाऊ घालताना प्रार्थना करावी की नात्यात हा गोडवा नेहमी टिकून राहावा.
 
दिवा
राखी बांधण्याची सुरुवात करत असतानाच दिवा प्रज्वलित करून घ्यावा. दिव्याच्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
पाण्याने भरलेला कलश
पाण्याने भरलेला चांदीचा किंवा तांब्याचा कलश ताटात असावा. याच्या प्रभावाने भाऊ-बहिणीच्या जीवनात सुख आणि प्रेम स्थायी राहतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti

श्री रामदास नवमी 2024 : कोण होते समर्थ गुरु रामदास स्वामी

महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments