Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनामुक्त गावात 10वी-12वी वर्ग सुरू होणार !

10th-12th class will start in Coronafree villages in Maharashtra
Webdunia
बुधवार, 23 जून 2021 (12:16 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे इयत्ता 10वी (SSC)आणि 12वीचे (HSC)वर्ग कोरोनामुक्त झालेल्या गावांत सुरू करण्यात येऊ शकतात का याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठकही संपन्न झाली. राज्यात कोरोनामुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पहावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. 
 
जी गावे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10 आणि 12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहाण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
 
या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
बारावी परीक्षा मूल्यांकन निकषांबाबत
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणांचे मूल्यांकन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या मूल्यांकनाच्या धर्तीवर आणि राज्याने दहावीच्या मूल्यांकन बाबत जी पद्धत निश्चित केली आहे. या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास करूनच बारावी विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत निकष ठरवून याबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत शिक्षण विभागाला सांगितले आहे
 
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

गडचिरोलीच्या जंगलात 2026 पर्यंत नक्षलवाद संपेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

LIVE: सीईटी परीक्षा आता राज्यातील केंद्रावर होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार! उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले

भाजपची निवडणूक तयारी तीव्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा जिल्हाध्यक्षांना कडक संदेश

उद्यापासून भारतीय पुरुष हॉकी संघ विश्वचषकासाठी टॉप 4 संघांशी सामना करणार

पुढील लेख
Show comments