Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नंदुरबार येथे प्रसादातून 125 लोकांना विषबाधा

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (10:30 IST)
नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथे महाशिवरात्रि निमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन गावात एका ठिकाणी करण्यात आलं होतं. मात्र महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उलट्या होवू लागल्या. हळूहळू उलट्या होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलट्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रसादातून विषबाधा झाल्याचा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
 
 माहिती आरोग्य विभागाचे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 लोकांना विषबाधा झाली तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून 40 जणांवर राकसवाडे आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत.  
 
विषवाधा कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. कारण गावातल्या अनेकांना विषबाधा झाल्याने हा प्रकार कुणी जाणूनबुजून केलाय किंवा यात कशामुळे झालाय याची चौकशी करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments