suvichar

अकरावीसाठी आता फक्त 15 गुण ग्रेस

Webdunia
पुणे- राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. एखादा विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला यापूर्वी 30 गुण ग्रेस दिले जात होते. त्याला आता केवळ 15 गुण ग्रेस मिळतील. यामुळे अकरावीत नापासाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
अकरावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केल्याने हा बदल करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे अकरावीसाठी हा नियम लागू राहील. तो केवळ तीन विषयांसाठी मर्यादित असेल. एकाच विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्याला कमाल दहाच गुण ग्रेस म्हणून दिले जातील. अकरावी आणि बारावी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या निकषातील तफावत यामुळे दूर होणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.
 
अकरावीत तीन विषयांत व दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण विभागून दिले जात होते. म्हणजे त्याला तीन विषयांत प्रत्येकी दहा गुण मिळत होते. आता तेवढे गुण मिळणार नाहीत.
 
विद्यार्थी तीन व दोन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला बारावीप्रमाणे 15 गुण विभागून दिले जातील. निकषात बदल करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य शासनाकडे पाठविला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली चिरडून नगरपालिकेचे दोन कर्मचारी ठार; परभणी मधील घटना

LIVE: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागकडून १९ जुलै रोजी मेगा ब्लॉक लागणार

जिओच्या 5G नेटवर्कचा विस्तार आणखी मजबूत झाला, True5G ग्राहकांची संख्या २८.५ कोटींवर पोहोचली

सोनमजी, देशाला तुमची गरज आहे; कृपया तुमचे उपोषण संपवा… सुप्रिया सुळे यांचे जंतर मंतरवर भावनिक आवाहन

सततच्या पावसात सोयाबीन वाचवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments