Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारू पार्टी, बिर्यानी, नशेमध्ये रफ ड्राइव्हिंग कार अपघातात 2 जणांचा मृत्यू 3 जखमी

Webdunia
गुरूवार, 11 जुलै 2024 (14:24 IST)
महाराष्ट्रातून खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे काही तरुण दारू पिऊन बिर्यानी खाण्यासाठी निघाले. त्यानंतर त्याच्या कारचा अपघात झाला आहे. 
 
रील बनवण्याच्या नादात काही तरुणांना जीवावर बेतले आहे. महाराष्ट्रातील नागपूर मध्ये काही तरुण दारू पिल्यानंतर रील बनवण्यासाठी रफ ड्राइविंग करीत होते. ज्यात त्यांचा अपघात झाला आहे या घटनेमध्ये दोन जणांचा अपघात झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे. 
 
सर्वांचे वय 19 ते 20 वर्ष-
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये घडलेल्या या कार अपघातात कारमध्ये पाच जण होते. सर्वांचे वय 19 ते 20 आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून हे तरुण परतत होते. ही दुर्घटना सकाळी 2:30 वाजता नागपूरमध्ये घडली आहे.  
 
पोलीस अधिकारींनी दिली माहिती-
नागपुरचे पोलीस कमिश्नर रविंद्र सिंघल यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल केलेल्या तीन पैकी दोन जणांची प्रकृती स्थिर आहे. तर एकाची गंभीर आहे. तसेच घटनास्थळी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे मुलं गाडीमध्ये बसून रील बनवत होते. गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली. ज्यामुळे हे प्रकरण घडलं आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानला IMF कडून 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज, भारताने व्यक्त केली होती ही भीती

LIVE: फडणवीस म्हणाले, "पाकिस्तान हा एक दहशतवादी देश''

पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद लिहून पाकिस्तानला पाठिंबा देणे विद्यार्थिनीला महागात पडले, तुरुंगात पाठवणी झाली

पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपण युद्धाच्या स्थितीत आहोत, संजय राऊत यांनी भारत पाक हल्ल्यावर दिली प्रतिक्रिया, शेअर केले फोटो

पुढील लेख
Show comments