Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देणार

Webdunia
बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (21:48 IST)
मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. तसेच, पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
 
“मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. 2 वर्षांपूर्वी कुणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला माहिती नाही. पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे” अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना 25 हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
 
याशिवाय, अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगार घराची लॉटरी तात्काळ काढण्यात येणार आहे. 50 हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments