Festival Posters

लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या कारचा अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (16:48 IST)
अमरावती- लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नांदगावपेठ-देवलगाव रिंगरोडवर घडला. माहितीनुसार ट्रक आणि कार यांची धडक एवढी भीषण होती की, कारचा चुरा झाला तर ट्रकची पुढील दोन्ही चाके निघून गेली. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. 
 
अंजनगाव सुर्जी गावातील रहिवासी हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी वाळगावमार्गे नांदगावपेठ येथे जात असताना पोटे कॉलेजजवळ कार आली असताना चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रक विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडला. तर कारचा चुरा झाला. 
 
अपघातात चार जणांचा मृत्यू जागीच झाला होता, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वर्धा-चंद्रपूर सीमेवर वाळू माफियां मधील टोळीयुद्धात भारतीय जनता पक्षाचे नेते भरत नागपाल यांची निर्घृण हत्या

पश्चिम आशियातील तणावामुळे टेनिस स्टार डॅनिल मेदवेदेव दुबईत अडकले

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

नागपुरात कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाची केली 24 लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments