Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यवतमाळमध्ये ४८ तासांत ६ शेतक-यांची आत्महत्या

suicide
Webdunia
बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:28 IST)
दुष्काळ आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या 6 शेतक-यांनी यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 48 तासांत आत्महत्या केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करीत आहेत मात्र शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप शेतक-यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातींद्वारे प्रसिध्द केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत. विश्वगुरू म्हणून मिरवणारा भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे म्हणूनच भाजप सध्या ते राम मंदिराच्या मुद्यावरून भावनिक फुंकर घालून राजकारण करीत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली. इंडिया आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते

पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात

Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सर्व पहा

नवीन

केवळ भारतच नाही तर हे देशही 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात

राष्ट्रध्वज तिरंगा दुमडण्याची योग्य पद्धत

Independence Day 2025 Quotes Marathi स्वातंत्र्य दिन मराठी कोट्स

Independence Day 2025 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या गाडीत तिरंगा ध्वज नियमांनुसार लावला जातो का? स्वातंत्र्य दिनापूर्वी योग्य पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments