Publish Date: Sat, 01 Aug 2026 (10:30 IST)
Updated Date: Sat, 01 Aug 2026 (10:39 IST)
यवतमाळमधील अडण नदीच्या पुलावर पुराच्या पाण्यात एक एर्टिगा कार वाहून गेली. कार चालक बचावले तर त्याची पत्नी आणि दोन मुली बेपत्ता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात एका भीषण अपघाताने एका कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावून घेतला. दरवा तालुक्यातील दाहेली गावाजवळ अडण नदीच्या पुलावर पाण्याचा जोरदार प्रवाह लक्षात न आल्याने एक एर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. चालक अविनाश नामदेव खंडारे यांनी झाडाला धरून आपला जीव वाचवला, परंतु त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि दोन निष्पाप मुली कारसोबत पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. तिघांना शोधण्यासाठी शोध आणि बचाव कार्य सुरू होते.
दरम्यान, विदर्भात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती विभागातील अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आला असून, अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहे. परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने मदत आणि बचाव पथके सक्रिय केली आहे.
Edited By- Dhanashri Naik