Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितेश राणेंवर भडकाऊ भाषण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (15:22 IST)
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर भडकाऊ भाषण देत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर मध्येरामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ  हिंदू समाजातर्फे मोर्चा काढला. याला नितेश राणे यांचा पाठिंबा होता. एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितेश राणे यांनी भडकाऊ भाषण दिले. या भाषणात त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली. मशिदीत प्रवेश करून आम्ही मुस्लिमांना निवडून मारू

या प्रकरणी नितेश राणेंवर चिथावणीखोर वक्तव्य आणि उघड धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यानंतर नितीश राणेंची सभा होती.त्यात त्यांनी मुस्लिमांना धमकावले.ते म्हणाले, आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणीही काहीही बोलले तर आम्ही मशिदीत जाऊन निवडक मारू. रामगिरी महाराजांनी प्रेषितांवर भाष्य केल्यामुळे मुस्लिम समुदायाकडून त्यांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. 
श्रीरामपूर मध्ये आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितेश राणेंवर भडकाऊ भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.तोफखाना पोलिस नितीश राणे यांना आज म्हणजेच सोमवारी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहेत. नितीश राणे यांनी एका कार्यक्रमात मुस्लिमांना खुलेआम धमकावत ते मशिदीत येऊन त्यांना निवडक मारणार असल्याचे वक्तव्य दिले.भाजपला निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार घडवायचा आहे, असा आरोप AIMIM नेते वारीश पठाण यांनी केला.  
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पुढील लेख
Show comments