Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात तरुणाची हत्या

Webdunia
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (10:34 IST)
दिवाळीचा सण सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला, कोरोनाच्या नंतर दोन वर्षांनी यंदा सर्व सण कोरोना निर्बंध साजरे केले जात आहे. यंदा लोकांमध्ये उत्साह दाणगा आहे. काही ठिकाणी या सणाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या आहे. मुलांमध्ये दिवाळीला आतषबाजी करण्यासाठी जल्लोष वेगळाच असतो. मुलं फटाके फोडतात. फटाके फोडताना अपघात देखील होतात. या मुळे फटाके चालवताना काळजी घेण्यास सांगितले जाते. गोवंडीत फटाक्यांच्या वादावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात नटवर पारेख कंपाउंड येथे घडली. सुनील नायडू(21) असे या मयत तरुणाचे नाव आहे. तर त्यांच्यावर मारहाण करणारे मुलं 12 ते 15 वयोगटातील आहे. 

दिवाळीत काही अल्पवयीन मुलं सोमवारी दुपारी नटवर पारेख कंपाउंड मध्ये बाटलीतून फटाके फोडत असताना सुनील यांनी मुलांना फटाके बाटलीतून फोडण्यास रोखले. या वर तिन्ही अल्पवयीन मुलांनी सुनील यांच्याशी वाद घातला आणि त्यांना जबर मारहाण करत चाकूने सपासप वार करायला सुरु केले. या हल्ल्यामुळे सुनील हे गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतातच त्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसरा मुलगा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, 26 सप्टेंबरपर्यंत अटकेवर बंदी, पोलिसांना दिल्या 'या' सूचना

या आमदाराने गौतमी पाटीलसोबत केला डान्स, लोकांना सांगितले माझा व्हिडिओ व्हायरल करा

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर काय बोलले संजय राऊत? महाराष्ट्र निवडणुकीबाबत रणनीती उघड केली

नागपुरात भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, अनेक जखमी

सांगलीमध्ये राहुल गांधी म्हणाले 'पंतप्रधानांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी

पुढील लेख
Show comments