Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सुमारे 36 लाख नवीन मतदार

Webdunia
बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:58 IST)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सुमारे 36 लाख नवीन मतदारांची भर पडणार आहे. त्यामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असून तृतीयपंथीयसुध्दा आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जागृत झाला आहे. राज्यभरात ऑक्टोंबर 2018 अखेर 2025 तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी झाली आहे. राज्यात 1 सप्टेंबर 2018 ते 11 जानेवारी 2019 या कालावधीत मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. आतापर्यंत 36 लाख नवीन अर्ज आले असून त्यामध्ये मागील नोंदणीच्या तुलनेत यंदा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समजते.
 
निवडणूक कर्मचार्‍यांनी घरोघरी जाऊन ज्यांची नोंदणी नाही, पण मतदानासाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. 1 जानेवारी 2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेले, घरातील व्यक्तीचे नाव दुसर्‍या मतदार यादीत असलेले, मयत व स्थलांतरीत झालेले, नावात दुरुस्ती व दिव्यांग मतदारांची यादी तयार केली आहे. तसेच ज्यांची नावे दोनपेक्षा अधिक मतदार यादीत आढळली, अशांची नावे वगळली आहेत. 11 जानेवारी 2019 रोजी अंतिम यादी तयार होण्याची शक्यता आहे. या यादीतील व्यक्ती मतदानासाठी पात्र असतील, असे एका निवडणूक अधिकार्‍याने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments