Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विहिरीचा कठडा तुटला अनर्थ झाला तिघांचा मृत्यू तर अनेक अडकले

Webdunia
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (08:59 IST)
मुंबई येथील विलेपार्ले परिसरातील धार्मिक कार्यक्रमासाठी महिला रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ एकत्र आल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. अचानक झालेल्या या प्रकाराने एकाच गोंधळ उडाला होता. लगेच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोचले आणि विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले. जखमींना व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल असून, दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. माधवी पांडे (वय - ४९), रेणू यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावं आहेत. सध्या घटनास्थळी रात्री उशीर पर्यंत बचाव सुरु होते. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणात महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आलं असून अजून काही महिला अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत्नाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments