Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवावी, असं आव्हान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला भाजप नेते मोहित कंबोज यांनी उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे हे 2019 ची वरळीतील निवडणूक सचिन अहीर यांच्यामुळे जिंकले होते. त्यामुळे त्यांना इतकाच स्वतःवर विश्वास असेल तर त्यांनी राजीनामा देऊन एकनाथ शिंदेंविरोधात निवडणूक लढवावी, असं कंबोज म्हणाले.
आदित्य ठाकरेंचा एकतर्फी विजय दाखवण्यासाठीच सचिन अहीर यांना निवडणुकीआधी शिवसेनेत आणलं गेलं, असंही ते म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
Published By- Priya Dixit