Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले

Webdunia
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (16:02 IST)
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजमहलबाहेर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले. बाबा कांबळे आणि केशव क्षीरसागर यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. राज ठाकरेंसमोर आपल्याला बोलू न दिल्याने बाबा कांबळे यांनी संताप व्यक्त केला. रिक्षाचालकांची भूमिका आपल्याला मांडायची असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. यावर केशव क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा शाब्दिक वाद आणखीनच पेटला. यावेळी तिथे उपस्थित इतरांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
राज ठाकरे भेटीत काय झालं?
बाइक टॅक्सीमुळे आमचं जगणं मुश्किल झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत.तुमचा शब्द कोणी टाळत नाही. आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे केली.
 
‘बेकायदा बाइक टॅक्सी बंद करा’; पुण्यात हजारो रिक्षाचालकांचे ठिय्या आंदोलन
“मी या संदर्भात संबंधितांसोबत बोलतो आणि तुम्हाला कळवतो. आज संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी नक्की बोलणं होईल,” असं राज यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर पुन्हा एका पदाधिकाऱ्याने यापूर्वी तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत असं सांगत आमचीही मदत करावी असं गाऱ्हाणं घातलं. यावर राज यांनी आपल्या आसनावरुन उठता उठता, “आम्ही फक्त प्रश्न सोडवयालाच असतो,” असं म्हटलं. राज ठाकरेंची ही पाच शब्दांची प्रतिक्रिया ऐकून उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अटल सेतूवर कार डंपरच्या अपघातात एकाचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

केदारनाथ यात्रे दरम्यान महाराष्ट्रातील एका प्रवाशाचा मृत्यू

भाजप आमदारांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर, फडणवीसांनी दिले कारवाईचे निर्देश

विंध्यवासिनी ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई, 81.88 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुढील लेख
Show comments