Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यासाठीच संसदेचा विशेष अधिवेशनाचा अजेंडा: नाना पटोले

Webdunia
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (21:44 IST)
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर आणि कोव्हीड महामारीसारख्या काळात विशेष अधिवेशन बोलावले नाही. पण मुंबई महाराष्ट्र राज्यापासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करणे हा संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा अजेंडा असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केला.
 
18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा केंद्र सरकारने अजूनही स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवरच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून ही सत्ताधारी पक्षावर टिका केली जात असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
माध्य़मांशी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारी किंवा 2016 मध्ये केलेल्या नोटबंदी सारख्या मुद्द्यावर तसेच मणिपूरसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर संसदेचे विशेष अधिवेशन कधीही बोलावले नाही. आता सरकारच्या मन:स्थितीनुसार अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करूनन महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठीच बोलावले आहे.” असा आरोप पटोले यांनी केंद्र सरकारवर केला.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

International Museum Day 2025: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन इतिहास आणि महत्व जाणून घ्या

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

पुढील लेख
Show comments