suvichar

वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

Webdunia
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:52 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या प्रस्तावित दौऱ्यावरदेखील अजित पवार यांनी तोंडसुख घेतलं. 
 
शिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावरदेखील पवार यांनी सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार?, असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर येथील टेंभपुरी धरणात तीन मजुरांचा बुडून मृत्यू

मारेकऱ्याला फाशी दिल्याशिवाय कोणत्याही राजकारणीलाआमच्या घरी प्रवेश नाही, मुलीच्या पालकांची संतप्त प्रतिक्रिया

LIVE: छत्रपती संभाजीनगर येथील टेंभपुरी धरणात तीन मजुरांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्राला पहिली 1 कोटी 'लखपती दीदी' मिळणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

नसरापूर बलात्कार प्रकरणात संजय राऊतांची प्रतिक्रिया सरकार व्हीआयपी सुरक्षा आणि निवडणुकांमध्ये व्यस्त आहे म्हणाले

पुढील लेख
Show comments