Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवारांनी सांगितला किस्सा आणि उपस्थितांना हसू झाले अनावर

Webdunia
गुरूवार, 19 जानेवारी 2023 (15:17 IST)
विरोधी पक्षनेते अजित पवार  हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच ओळखले जातात. अशाच एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांना हसू अनावर झालं. बारामतीत सुरु असलेल्या मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. अजित पवार यांच्यावर डॉ. तात्याराव लहाने यांनी शस्त्रक्रिया केली होती.
 
"एकदा परदेशात गेल्यावर मला जाणवलं की माझ्या डोळ्याला काही झालं आहे. त्यानंतर पुन्हा मंत्रालयात असताना मला डोळ्याला त्रास होत असल्याचे जाणवलं. मी तिथून उठलो आणि गाडीत बसलो आणि डॉक्टर लहाने यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी बॅटरी डोळ्यात टाकली आणि त्यांनी काहीतरी तपासलं. ते म्हणाले तुमचा रॅटिनाचा प्रॉब्लेम आहे. त्याला लेझरने बांध घालावा लागेल. उसाला बांध घालतो तसा डोळ्यात बांध घालावा लागेल असे ते म्हणाले. डॉक्टर सांगतात ते ऐकावे लागतं. ते म्हणाले कधी ऑपरेशन करायचे मी आत्ताच्या आता करा सांगितले. घरी ऑपरेशन झाल्यावर सांगेन. तिथेच डॉक्टरांनी मला आडवा केला आणि डोळ्यात बांध घातला," असे अजित पवार म्हणाले.
 
"मी त्यांना हे मलाच का झाले असं विचारलं तर अजित पवार हे दहा लाखांमध्ये एका होतं असं त्यांनी सांगितले. बरा दहा लाखांत मीच सापडलो. त्यानंतर चष्मा वापरायला लागतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे," असेही अजित पवार म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments