Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती : मुलांनी लावलं 80 वर्षाच्या वडिलांचे थाटामाटात लग्न

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (19:06 IST)
अमरावती जिल्ह्यांत एक अनोखे लग्न पार पडले. मुलांनी चक्क आपल्या 80 वर्षाच्या वडिलांचे लग्न 65 वर्षाच्या महिलेशी थाटामाटात पार पडले. या लग्न सोहळ्याला वधू-वरांचे मुलं, सुना, नातवंडे सहभागी झाले होते. या लग्नाची जिल्ह्यांत चर्चा होत आहे. 

हे प्रकरण अमरावतीतील अंजनगावच्या सुर्जी तालुक्यातील चिंचोली राहिमापूर येथील आहे.80 वर्षीय विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. विठ्ठल यांना चार मुलें, मुली, नातवंडे असा परिवार असून वराचा 50 वर्षीय मुलगा देखील 80 वर्षाच्या वर आणि 65 वर्षाच्या वधूच्या लग्नात सहभागी झाला होता. या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्याला एकटेपणा जाणवत होता. वडिलांनी लग्नाचा आग्रह धरल्यावर मुलांनी वडिलांसाठी वधू शोधण्यास सुरु केले. 

मुलांनी सुरुवातीला याचा विरोध केला. नंतर वडिलांच्या आग्रहाखातर मुलांनी होकार दिला आणि वडिलांसाठी वधू शोधू लागले. या साठी त्यांचा बायोडाटा तयार करण्यात आला. अखेर त्यांचा शोध संपला आणि अकोट, अकोल्यातील 66 वर्षीय महिलेशी लग्न ठरले. 

8 मे रोजी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला. मुलांनी आपल्या वडिलांची थाटामाटाने मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विठ्ठल यांची मुलें, नातवंडे  नाचताना दिसली. या लग्न सोहळ्यात चिंचोली रहिमापुरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. तालुक्यात या अनोख्या लग्नाची चर्चा सुरु आहे. 

Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments