Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीसांना कामं नाहीत,भाजपने त्यांना प्रवक्त्या करावं

Webdunia
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (10:31 IST)
"अमृता फडणवीस यांना काही काम नाही, भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी," असा टोला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी लगावला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामावरुन अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
 
"काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात," असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.
 
यावर प्रतिक्रिया देताना मनिषा कायंदे म्हणाल्या, "अमृता फडणवीस यावेळेस पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे भाजपने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी."
 
"राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असताना पुण्यात मात्र नियम काय ठेवण्यात आले आहेत. पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असून राज्य सरकारने असं का केलं?" असा प्रश्नही अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला.
 
मनिषा कायंदे यांच्यापाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "कोण अमृता फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ना? नावडतीचं मीठ आळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे." असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments