Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये --अमृता फडणवीस

Amrita Fadnavis
Webdunia
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:12 IST)
संभाजी भिडे यांनी मंत्रालयाबाहेर प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला आधी टिकली लावून ये मग मी बोलेन, असा सल्ला दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. विविध क्षेत्रातून संभाजी भिडे यांच्या या विधानाचा निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे. 
 
पंढरपूरमध्ये अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना संभाजी भिडेंनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमृता फडणवीस म्हणाल्या की, संभाजी भिडे गुरुजींचा मी खूप आदर करते. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला वैयक्तिकरीत्या असं वाटतं की, कुठल्याही महिलेने कसं जगावं, याबाबत कुणी सल्ला देऊ शकत नाही. तिची एक जीवनशैली असते. त्याप्रकारे ती जगते. त्याचा आदर करावा, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

World Ocean Day 2025 जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? प्रमुख आव्हाने आणि आपला योगदान

आता स्टॅम्प पेपरची गरज राहणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

LIVE: पुणे-मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी

Bengaluru Stampede: आरसीबी अधिकाऱ्यासह चौघांना अटक;14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली,नियमित तपासणी आणि चाचण्यांनंतर डिस्चार्ज केले

पुढील लेख
Show comments