Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यामध्ये तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (16:27 IST)
Thane news: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे आणि एक मित्र बेपत्ता झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार हे मुलं 13-15 वर्षांचे होते. हे दोघेही मुलं गुरुवारी संध्याकाळी भिवंडीतील तलावावर आंघोळीसाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. भिवंडी टाऊन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दोन मुलांसोबत असलेल्या तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.  गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तिन्ही मुले शाळा संपवून घरी परतली. व तिघेही फिरायला बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी तिन्ही मुले पोहण्यासाठी तलावात गेल्याची माहिती मुलाच्या भावाला मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी उशिरा तलावातील मुलांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. पण, अंधारामुळे तिसऱ्या मुलाचा शोध थांबवावा लागला. आज सकाळी पुन्हा तिसऱ्या मुलाचा शोध सुरू करण्यात आला.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments