Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा निघणार

Webdunia
शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (21:40 IST)
हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक विम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावरू राष्ट्रवादी सरकारला घेरणार आहे. नागपूरमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचा हा मोर्चा शरज पवारांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.  यंदा १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनादिवशी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली.
 
राज्यात गेल्या चार महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपासोबत युती करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. दरम्यान, या सरकारला आता जवळपास ४ महिने उलटून गेले आहेत. मात्र, ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीच्या एकत्रित रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठकही मुंबईत पार पडली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments