Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रेकिंग! दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर

Webdunia
बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:05 IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये ९६  विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांनावैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
नेमकं काय घडले?
खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 असून आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments