Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळाची 3.5 लाख रुपयांत विक्री

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (15:24 IST)
महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एक वर्षाच्या बाळाची विक्री केल्याचं धक्कादायक प्रकरण बीड जिल्ह्यातील बाजलगाव येथे घडले आहे.
 
पतीपासून वेगळी राहात असलेल्या महिलेच्या एक वर्षाच्या बाळाची तब्बल 350000 रुपयांना विक्री करण्यात आली होती. मात्र पोलिसांद्वारे तत्काळ कारवाई करण्यात आली असून पाच आरोपींना अटक केली गेली आहे. बाळ सुखरुप आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
 
माहितीनुसार एका 20 वर्षीय तरुणीला प्रेमसंबंध असल्याच्या शंकेवरुन पतीने वेगळं केलं. महिला आपल्या बाळासोबत माहेरी माजलगाव येथे राहात होती. जेथे छाया नावाच्या महिलेचं येणेजाणे होते तेव्हा तिने बुलढाणा येथील वासुदेव भोजनेसोबत तिचे दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दिली. दरम्यान, छायाने मध्यस्थी करत कोल्हापूर येथील ललिता नावाच्या महिलेशी संपर्क साधत ग्राहक शोधून मुलाची विक्री केली. बाळ तब्बल 350000 रुपयांना विक्री केले गेले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे.
 
आरोपीची नावे छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव), किशोर वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा), ललिता मनोहर भिसे (वय 38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर), दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव, कर्नाटक), आप्पा राघोबा केरकार (वय 65 वर्षे), नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे), स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सत्तरी, उत्तर गोवा) असे आहेत.
 
दरम्यान प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोपी ललिता व दीपक हे दोघे सध्या फरार आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments