suvichar

मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्या विधनासभा मुलाखती सुरु

Webdunia
लातूर येथे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांसाठी ७० जणांनी मुलाखती दिल्या-अर्जही दिले. या सत्तर जणात लातूर शहरमधून १६, अहमदपुरातून १३, लातूर ग्रामीणमधून १२, उदगीरमधून १०, औशातूनही १० तर निलंग्यातून ०९ जणांनी उमेदवारी मागितली. लातूर राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मनियार यांनी रात्री वंचितमध्ये रितसर प्रवेश केला. यावेळी लातुरच्या विश्रामगृहात मोठी गर्दी झाली होती. 
 
पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य रेखाताई ठाकूर, अशोक सोनवणे आणि अण्णाराव पाटील यांनी मुलाखती घेतल्या. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी सेक्युलर पार्टी नाही, मागच्या निवडणुकीत या पक्षाने भाजपासाठी काम केले असा आरोप रेखाताई ठाकूर यांनी केला. 
 
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवारीसाठी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असणाऱ्यांना प्राधान्य देणार आहे. वंचित बहुजन आघाडीला मागच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, विधानसभा निवडणुकीमध्येही ही आघाडी आपली जादू निश्चितच दाखवून देणार आहे. 
 
आघाडीच्या वतीने नुकत्याच विदर्भातील ११ जिल्ह्यांत तब्बल ६५० उमेदवारांनी आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या आहेत. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातही असाच प्रतिसाद मिळाला असून लातुरातूनही ही संख्या जवळपास साठ एवढी आहे. उमेदवारी देताना आघाडी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती वा कार्यकर्त्याला उमेदवारी देणार नाही. समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण कायदा लागू होऊ शकतो, सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे

राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य: युद्धामुळे ऊर्जा संकट अधिक गडद, ​​भारतासमोर 'मोठी परीक्षा'

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

महाराष्ट्रात मोठे बदल, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments