Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसीबीच्या गळाला मोठा मासा; नाशिकमध्ये ५० हजारांची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2023 (20:48 IST)
नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्यासह एकाला 55 हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी अटक केली आहे. यामुळे महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
 
मनपा शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी सुनिता धनगर व लिपिक नितीन जोशी अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत. निलंंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजु करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती तर लिपिकाने 5 हजार रुपये लाच म्हणून मागितले होते. यापूर्वी महानगरपालिकेमध्ये सुमारे तीन महिन्यापूर्वी दोन लिपिकांना लाच घेताना अटक केली होती त्यानंतर ही एक मोठी कारवाई आहे.
 
सुनिता धनगर या शिक्षण विभागाकडून महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आले असून त्यांचा महानगरपालिकेतील कार्यकाळ पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. त्यापूर्वीच त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी नाशिक मध्ये सहकार उपनिबंधक सतीश खरे यांना लाच घेताना अटक केली होती त्यानंतर ही मोठी कारवाई मानली जात आहे. यामुळे महानगरपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments