Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीचा विजय

Webdunia
मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (09:07 IST)
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्याने, या दाव्या-प्रतिदाव्यांमधील तथ्य शोधणे कठीण असले, तरी या निकालांचा एकूण कल हा भाजप; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकल्याचे दिसते.
 
शिंदे-फडणवीस या दोघांचा आकडा हा 185वर; तर महाविकास आघाडीचा आकडा हा 225वर गेल्याचे दिसते. अशा वेळी पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या एकनाथ शिंदे गटानेही काही ठिकाणी अनपेक्षित विजय मिळवला असताना, शिवसेना आणि काँग्रेसला मात्र वैयक्तिक्तरीत्या काही ठिकाणी फटका बसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे.
 
राज्यात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची जी काही आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली, त्यानुसार 494 पैकी 144 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.
 
'राष्ट्रवादी'कडे 126, शिंदे गटाला 41, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 37, तर काँग्रेसला 62 जागा मिळाल्या आहेत, तर इतरांनी 88 जागांवर सरशी घेतली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments