Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीजदरवाढ आणि वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर भाजपकडून राज्यभरात टाळाठोक आंदोलन

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:44 IST)
वीजदरवाढ आणि वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने राज्यभरात टाळाठोक आंदोलन केले आहे. यावर राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सरकारने १२ युनिट वीज बिल माफ केले पाहिजेत आणि सुधारित बिलांबाबत नोटीस दिली पाहिजे अशी मागणी भाजपने घेतली आहे. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु केले आहे. सरकारने जवळपास ७२ लाख जनतेची मीटर कापण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यातील कमीत कमी ४ कोटी नागरिक अंधारात येणार आहेत. राज्य सरकार मुघलांसारखे इंग्रजांसारखे वागत आहे. म्हणून आम्ही या सरकारविरोधात, मुख्यमंत्र्यांविरोधा आंदोलन करतो आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते की, राज्यातील शेतकऱ्यांचे पैसे माफ केले. शेतकऱ्यांचे तर मागील पाच काळात आम्ही वीजकनेक्शन कधीच कापले नाही. हजारो कोटी थकित असतानाही आम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले नाही किंवा शेतकऱ्यांकडे पैसे मागितले नाहीत. परंतु राज्य सरकार शेतकऱ्यांना ५० टक्के पैसे भरा असे सांगत आहे. ग्रामपंचायतमध्ये पत्रक आले की, जो पैसे वसूल करेल त्याला १० टक्के कमिशन देऊ. हे सरकार कमिशनवर चालणारे सरकार आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनावेळी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

पुढील लेख
Show comments