suvichar

शिवसेनेची भाजपवर जोरदार टीका काश्मिरातून सत्तेतून बाहेर पडा

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:06 IST)
काश्मीर मध्ये हिसाचार होतो. ज्यांच्या सोबत तेथे सत्ता आहे ती सत्ता सोडून का देत नाहीत असा प्रश्न शिवसेनेन विचारला आहे. आपले जवान तेथे रोज शहीद होत आहेत. याची काळजी तुम्हाला वाटत नाही का ? शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे आमच्या विरोधात बातम्या पसरवत, मग तुम्ही का सोडत नाहीत सत्ता असा प्रश्न शिवसेना विचारात आहे. शिवसेनेच्या मुखपत्र सामना मधून जोरदार टीका केली आहे. वाचा काय म्हणते आहे शिवसेना : 

‘जय जवान जय किसान’ या घोषणेच्या कशा चिंधड्या उडाल्या आहेत ते पहा. महाराष्ट्राच्या मंत्रालयात धर्मा पाटील हे ८४ वर्षांचे शेतकरी आत्महत्या करतात व कश्मीरात भाजपप्रणीत सरकार अतिरेक्यांना मारले म्हणून लष्करावर गुन्हे दाखल करते आणि वर आपल्याच सरकारविरोधात आकांडतांडव करण्याचे ढोंगही रचते. हे ढोंग करण्यापेक्षा सरकारमध्ये का राहता? सत्ता का सोडत नाही? राष्ट्रहिताचा व लष्कराच्या मनोधैर्याचा तसेच स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने आम्ही हे बोलतोय. आमचा कुजबुज वाहिनीवर विश्वास नसल्याने थेट प्रश्न विचारीत आहोत.

सरकारमध्ये राहता, मंत्रीपदे भोगता आणि पुन्हा सरकारवर टीका करता? त्यापेक्षा सरकारमधून बाहेर का नाही पडत, असले प्रश्न शिवसेनेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुजबुज वाहिनीकडून नेहमीच प्रसवले जातात. खरं तर हा प्रश्न त्यांनी जम्मू-कश्मीर सरकारात खुर्च्या उबवून पुन्हा सरकारविरोधात गोंधळ घालणाऱ्या स्वकीयांना विचारायला हवा. मेहबुबा सरकारात भाजप सहभागी आहे व त्या मंडळींनी आता सरकारविरोधात ‘मस्ती’ सुरू केली आहे. ताजे प्रकरण शोपियान जिल्ह्यातील लष्करी ताफ्यावरील हल्ला आणि दगडफेक करणाऱ्यांऐवजी लष्करावरच गुन्हा दाखल करण्याबाबतचे आहे. गस्तीसाठी निघालेल्या लष्कराच्या ताफ्यावर तीन दिवसांपूर्वी दक्षिण कश्मीरातील गनोवपुरा येथे चारशे-पाचशेच्या जमावाने भयंकर हल्ला केला. प्रचंड दगडफेक केली. लष्करी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या मेजर व सात जवानांना ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे लष्करास स्वसंरक्षणासाठी बंदुका चालवाव्या लागल्या. त्यात दोन दगडफेक्यांचा मृत्यू झाला. आता या सर्व प्रकरणात लष्करावर ठपका ठेवून संबंधित मेजर व त्यांच्या गस्ती पथकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश मेहबुबा सरकारने दिले. त्यामुळे गोची झालेल्या भाजपने हातपाय झाडून, मुठी वगैरे आवळून सरकारचा निषेध केला आहे. कारण आता याप्रश्नी मौनक्रत धारण करून खुर्च्या उबवल्या तर मोठ्या जनउद्रेकास तोंड द्यावे लागेल अशी भीती त्यांना वाटत असावी. याप्रश्नी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

Tata Sierra EV vs Toyota Ebella: दोन शक्तिशाली इलेक्ट्रिक एसयूव्हींमधील लढाई, लॉन्चची तारीख आणि किंमत जाणून घ्या!

Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! हा प्रीमियम फोन ठरलेल्या वेळेआधीच होणार लाँच

'आय लव्ह यू मम्मी-पापा...' नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वडील कारगिलचे माजी सैनिक

निष्पाप मुलांचे भविष्य आणि पालकांचा कष्टाचा पैसा धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर बीएमसीने कारवाई सुरू केली

कुंभमेळ्यापूर्वी नाशिकच्या मार्कंडेय पर्वताचे पुनरुज्जीवन होणार; ४.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

पुढील लेख
Show comments