Dharma Sangrah

अजित पवार यांच्या संपर्कात भाजप कधीही नव्हती; पवार यांचा राजीनामा ‘स्क्रिप्टेड’- चंद्रशेखर बावनकुळे

Webdunia
मंगळवार, 9 मे 2023 (07:35 IST)
भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी कधीही संपर्क साधला नाही तसेच अशा प्रकारच्या अफवा काही लोकांकडून पसरवल्या जात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. खरेतर, अजित पवारांना महाविकास आघाडीतील (MVA), शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून लक्ष केले जात असल्याचा दावाही भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.
 
भाजपच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आणि त्यानंतरचा यू- टर्न म्हणजे नाटक असल्याचा दावा करून राजीनाम्याचा संपूर्ण भाग ‘स्क्रिप्टेड’ असल्याचे सांगितले.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, “गेल्या चार महिन्यांपासून मी आणि अजित पवार दोघेही एकमेकांच्या संपर्कात नाही. खरे तर अजित पवारांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जाते. आम्ही अजितदादांशी कधीही कसलाही संपर्क साधला नाही. काही अफवाही पसरवल्या जात आहेत” असेही ते म्हणाले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की काही लोकांमध्ये मतभेद असले तरी प्रश्न हा आहे की रयत शिक्षण संस्थेसह अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष बनलेले शरद पवार संस्थांच्या घटनेत फेरफार करून कोणालाही अध्यक्ष कसे होऊ देतील?” असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळणार; केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा

गुजरातमधील गोध्रा येथे भीषण आग, चार जणांचा गुदमरून मृत्यू

समाजवादी पक्षाने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली

LIVE: महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार चालना, राज्य सरकारच्या निर्णय

पुढील लेख
Show comments