Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मि. इंडिया जगदीश लाड याचे वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन

Webdunia
शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (15:11 IST)
तुम्हाला जर असा गैरसमज झाला असेल की मला काही होऊ शकत नाही आणि मी एकदम फिट आहे, तर थोडे थांबा, या महामारीला हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे माझी चांगली बॉडी आहे तर तसे नाही. बॉडी बिल्डिंगमधील सर्व सर्वोच्च खिताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे निधन झाले आहे. अवघ्या 34 वर्षाचा जगदीश होता. त्याने बडोद्यात अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
 
गेल्या वर्षी बडोद्यात नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. जगदीशला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
 आज अखेर त्याचे निधन झाले आहे.
 
जगदीश स्पर्धेसाठी उभा राहिला की पदक निश्चित असायचे कारण त्याची पिळदार यष्टि ही सर्वांना आकर्षित करायची. जगदीश त्यासाठी अपार मेहनतही करायचा रोज सकाळी उठून दोन तास व्यायाम, प्रोटीन्ससाठी चांगला डाएट, चिकन, अंडी, मटण रोजच्या रोज जगदीशच्या आहारात असायच्या.
 
कमी वयात जगदीश लाडने बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. नवी मुंबई महापौर श्रीचा खिताब त्याने जिंकला होता. त्याने महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर दोन वेळा मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले होते.
 
महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. बॉडीबिल्डिंग विश्वाचे एक नावाजलेला चेहरा गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पण त्याचबरोबर आपण फिट असल्याचा तोरा मिरवणाऱ्या लोकांनाही सावध करुन गेला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments