Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

maharashtra
Maharashtra Breaking News Live in Marathi : नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आणि मुंबई-पुणे संपर्क तुटण्याच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

मुंबईतील मानखुर्दमध्ये मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या भोकरबर्डी गावात एक जीर्ण झालेला विजेचा खांब बैलगाडीवर कोसळल्याने, विजेचा धक्का लागून एक शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैल ठार झाले. अशी माहीत समोर आली आहे. सविस्तर वाचा 

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर, खबरदारीचा उपाय आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून, शहरातील सर्व सरकारी, खाजगी आणि महानगरपालिका-संचालित शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने स्पष्ट केले आहे की हा निर्णय केवळ शैक्षणिक संस्थांना लागू आहे. सविस्तर वाचा 

भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने अनेक गाड्या रद्द केल्या आहे आणि अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहे. सविस्तर वाचा

कुर्ला येथे मुसळधार पावसात झाड कोसळून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. महापौर रितू तावडे यांनी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.  सविस्तर वाचा 

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवेच्या वेळापत्रकात व्यत्यय आला
मुंबईतील मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानतळाची धावपट्टी एक तासासाठी बंद करण्यात आली. ८७% विमानांना विलंब झाला आणि प्रवाशांना ७५ मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

देशभरात तांत्रिक शिक्षणावर मोठी कारवाई झाली आहे. नियमांचे उल्लंघन आणि विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे एआयसीटीईने ५८ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहे. सविस्तर वाचा 

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा विभागाने दिला आहे. सविस्तर वाचा 

पुण्यात भूस्खलनामुळे घर कोसळले; शाळा आणि महाविद्यालये बंद, हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुण्यातील पाटण येथील एका लहान, दुर्गम गावात सोमवारी सकाळी भूस्खलन झाले, ज्यात एक घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 
 
प्राथमिक माहितीनुसार, घरात राहणारे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. पुणे जिल्हा माहिती कार्यालयानुसार, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणेस्थित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ५ व्या बटालियनकडून मदत मागण्यात आली आहे. त्यानुसार पथक तैनात करण्यात आले.
 

कृषी मंत्री दत्तात्रेय भराणे यांनी बारामतीमध्ये एक मोठी घोषणा केली. "अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना" लवकरच पूर्ण होणार असून, या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. सविस्तर वाचा

मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेशासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. सविस्तर वाचा

मुसळधार पावसामुळे पुण्यातील पाटण गावात मोठे भूस्खलन झाले, ज्यात एक घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एकाच कुटुंबातील अनेक सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा

मुंबईत मुसळधार पाऊस आणि ताशी ९० किलोमीटर वेगापर्यंत सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. बीएमसीने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
 

देवळी-नाचनगाव रस्त्यावर फत्तेपूरजवळ मालवाहू वाहन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस आणि ताशी ९० किलोमीटर वेगापर्यंत सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. बीएमसीने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.सविस्तर वाचा...
 

मुंबईत मुसळधार पावसामुळे, वसई-विरार रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने आणि खंडाळा येथे भूस्खलन झाल्याने लोकल ट्रेन २० मिनिटे उशिरा धावत आहे. सविस्तर वाचा 

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात तिकोणे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला असून बचाव कार्यात तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात तिकोणे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला असून बचाव कार्यात तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी६ जुलै रोजी  पहाटे एका घरावर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडलीपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात तिकोणे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला असून बचाव कार्यात तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे..सविस्तर वाचा...
 

वर्धा जिल्ह्यातील देवळी-नाचनगाव रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा दुःखद मृत्यूदेवळी-नाचनगाव रस्त्यावर फत्तेपूरजवळ मालवाहू वाहन आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.सविस्तर वाचा...

सध्या राज्यात आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले आहे. इंद्रायणी नदीला पूर आला असून या बाबतीत गंभीर दखल देत वारकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आळंदीला न जाण्याचे आणि पुण्यातच राहण्याचे आवाहन केले आहे. 

सध्या राज्यात आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले आहे. इंद्रायणी नदीला पूर आला असून या बाबतीत गंभीर दखल देत वारकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आळंदीला न जाण्याचे आणि पुण्यातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.सविस्तर वाचा...
 

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या भीषण पूरपरिस्थितीत शहरातील विविध सखल भागांत अडकून पडलेल्या तब्बल ४०८ भाविक आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४x७ देखरेख ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिकांना पुढील दोन दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आणि मुंबई-पुणे संपर्क तुटण्याच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुणे यांसह अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खराब हवामानामुळे इंडिगोने प्रवासासंबंधी सूचना जारी केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुण्यासह अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजला असून, मुंबईत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे दुपारी समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजला असून, मुंबईत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे दुपारी समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.सविस्तर वाचा...
 
 

नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आणि मुंबई-पुणे संपर्क तुटण्याच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.सविस्तर वाचा...
 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४x७ देखरेख ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिकांना पुढील दोन दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.सविस्तर वाचा...
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुसळधार पावसासाठी राज्य सरकार सतर्क; एनडीआरएफ-एसडीआरएफला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश